कसे तरी दिवस काढत जगत होता तो ,
त्याच्यासोबत असे कोणतेच नाती राहिली नव्हती प्रत्येकास मदत करत आज रस्त्यावरच येउन पडला होता नशिबाचे खेळ असतात हे त्याला हि ठाऊक होतंच पण कुणाचे वाईट नको हा त्याचा स्वभाव, म्हणूनच आपल्याजवळ काही नसतानाही आपल्याकडून जेवढे होईल तेवढे तो नेहमीच करायचा . त्याचे हे रूप कसे विचारात असाल तर मी सांगतो ...
मुंबईत राहणारा हा मुलगा . घरातली परिस्थिती तशी हालाकीचीच काम करायचे महिनाभर आणि त्यातून जे पैसे मिळतील ते पैसे महिनाभर पुरवायचे हे सर्वेच करतात आणि ह्याच्या घरचेही तसेच होते . लहाणपण कसे गेले कळले नाही कसेतरी शाळा पूर्ण करून लगेच छोटे-मोठे काम तो करू लागला , तसा तो मेहनती होता पण त्याच्या खांद्यावर हाथ ठेवणारा आणि कर म्हणणारा असा कुणीच नव्हता तरी तो मेहनत करतच होता .
शाळा ,कॉलेज च्या दिवसात मुले मित्रांसोबत धमाल करतात ,मस्ती करतात प्रेम करतात पण ह्याला मात्र ते लाभलेच नाही लाभले ते फटके नशीब एवढीच ह्याची कथा . पण त्याकडे दुर्लक्ष्य करून तो जगात होता पण त्याच्या आयुष्यात एक दिवस कुणीतरी येत ज्याच्या येण्याने त्याचे जीवन आनंदी होऊ लागतं त्याला आता ती हवी असते पण मनात तोच विचार जर आपण लग्न केले तर तिला हि आपल्यासारखेच जगावे लागणार, आपल्यामुळे तिच्या नशिबात दुख नको .. मग तो निर्णय घेतो आता आपण ह्या प्रेमापासून दूर निघून जायचे आणि तिला काहीतरी कारण काढून दूर करतो . पण त्याला ह्या गोष्टीचे खूप दु:ख होतं खूप त्रास होतो कारण मनापासून प्रेम केले होते ना पण काय करणार नशिबात आलेल्या दुखला भोगावे तर लागणारच .. त्या मुलीचे हि खूप प्रेम असतंच पण तिला सुखात पहायचे होते म्हणूनच तर तो तिच्यापासून दूर झाला . तिच्या घरातल्यांनी तिचे लग्न करून दिले ती लग्न करून गेली हा मात्र त्या दिवशी खूप रडला कारण आता जगण्यासाठी काहीच नव्हते आणि मरण येत हि नव्हते आता फक्त वाट पाहत होता कधी मरण येतं ह्याची .. ती लग्न करून कुठे गेली कळलेच नाही वय निघत गेले हा जसा मेहनत करत होता तसाच राहिला पण कधी कधी तिची खूप आठवण यायची तेव्हा तो तिला आठवायचा तिचा तो पाकिटात ठेवलेला छोटासा फोटो आजही लपवून ठेवलेला होता तो पाहत रडायचा तिला पाणीपुरी खूप आवडायचे तो त्या गाडी जवळ जाऊन एकटाच पाहत उभे राहायचा तो तिथे येणा~या जाणा~या मुलीमध्ये तिला शोधायचा आणि थोडा हसायचा पण जेव्हा त्याला कळायचे कि ते स्वप्न आहे पुन्हा तो तिथून निघून जायचा . तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला त्याने पण तिचा पत्ता काही लागला नाही .
बघता बघता वय ५० च्या वर झाले होते तो आजही एकटाच होता त्याने तिच्याशिवाय आयुष्यात कुणालाच आणले नव्हते . तो थकला होता , कसे असतं ना आयुष्यापण कुणाला राजेशाही बक्षीस म्हणून मिळते तर काहींना रडतच जगावे लागतं आणि मरणही येत तेव्हा खांदे द्यायलाही पैसे आहेत कि नाही पहावे लागतं .
असेच तो हि एक दिवस एकटाच बसलेला होता सुट्टीचा दिवस होता रविवार होता . तो दिवस तसा रोजच्याच सारखा होता एकटाच बसलेला तिला आठवत आणि स्वतःला समजावत ती आता आपली नाही हे मनाला समजतच नव्हते .
त्यादिवशी का ठाऊक नाही तिच्या येण्याची चाहूल झाली पुन्हा तिचा हसरा चेहरा माझ्या नजरेला पडला ती आनंदी होती मला पाहून पण माझा हा अवतार पाहून तिच्या डोळ्यांत पाणी आले होते. तो उठला आणि म्हणाला " वेडे रडतेस कशाला तू आनंदी आहेस आता , बघ तुझ्या नशिबात असे माझ्यासारखे दुख नाही "....
ती म्हणाली मला ठाऊक आहे तुझे ते भांडण मुद्दाम होते मला ते उशिरा कळले रे .मला सुख मिळावं म्हणून तू माझे दुख हि तूझ्य नशिबात मागून घेतलेस , असे म्हणत तिने त्याला मिठीत घेतले ,काही क्षण श्वास थांबतो कि काय असे त्याला झाले होते कारण खूप दिवसाने तिचा स्पर्श झाला होता आणि आनंद काय असतो ते जाणवले होते पण ते आपल्या नशिबात नाही हे समजताच तिने तिला दूर केलं तिच्या मिठीतून सुटका केली .
तो म्हणाला हो मला असे दुखत तुला ढकलायचे नव्हते मी प्रेम केलें तुझ्यावर तुला सुखी पहायचे होते . बघ माझे काय मी कालही असाच गरीब आणि आजही असाच गरीब आहे .पण एक मागू तू मला देशील का ?
ती रडत होती तिला त्याला असे पाहवत नव्हते असा थकलेला शरीर कधी गळून पडेल असा तो दिसत होता .. ती म्हणाली मग ना सोन्या मी देईल तुला तू मागशील ते .. तू म्हणशील माझ्यासोबत आता हि लग्न कर तर मी आजही तयार आहे .
तो म्हणाला नाही असे नाही करायचे मला . तू फक्त मला थोडा वेळ तुझ्या मांडीवर डोके ठेऊ देशील का ?
तिने त्याला जवळ घेतले आणि डोके तिच्या मांडीवर ठेवले .
तो म्हणाला शोना मी जर आता मिलेओ तर गं ?....
तिने तिचा हाथ त्याच्या तोंडावर ठेवला आणि म्हणाली गप काही पण नको बोलूस .
तो म्हणाला खरेच शोना आता तुझ्या जवळच हे घडणार आहे ..मी खरेच तुझी वाट पाहत होतो गं ..मला हे जगणा नकोसे झालेलं मी तुला खूप शोधण्याचा प्रयत्न केलं तू कशी अशील बघण्याचा प्रयत्न केलं पण तू सापडली नाहीस .
पण आता तू आलीस ना तुला असे सुखी पाहून मी खरेच तृप्त झलेओ आता मोकळा झालो हे जीवन संपवायला ..
तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या .
आणि त्याने डोळे मिटून घेतला आणि खरेच तो बोलला ते झालं त्याने त्याचा श्वास सोडला होता , हे जग सोडले होते ....ती त्याला मिठीत घेऊन खूप रडत होती आणि देवाला म्हणत होती देवा का प्रेमाची अशी परीक्षा ? का ?.....
त्याच्यासोबत असे कोणतेच नाती राहिली नव्हती प्रत्येकास मदत करत आज रस्त्यावरच येउन पडला होता नशिबाचे खेळ असतात हे त्याला हि ठाऊक होतंच पण कुणाचे वाईट नको हा त्याचा स्वभाव, म्हणूनच आपल्याजवळ काही नसतानाही आपल्याकडून जेवढे होईल तेवढे तो नेहमीच करायचा . त्याचे हे रूप कसे विचारात असाल तर मी सांगतो ...
मुंबईत राहणारा हा मुलगा . घरातली परिस्थिती तशी हालाकीचीच काम करायचे महिनाभर आणि त्यातून जे पैसे मिळतील ते पैसे महिनाभर पुरवायचे हे सर्वेच करतात आणि ह्याच्या घरचेही तसेच होते . लहाणपण कसे गेले कळले नाही कसेतरी शाळा पूर्ण करून लगेच छोटे-मोठे काम तो करू लागला , तसा तो मेहनती होता पण त्याच्या खांद्यावर हाथ ठेवणारा आणि कर म्हणणारा असा कुणीच नव्हता तरी तो मेहनत करतच होता .
शाळा ,कॉलेज च्या दिवसात मुले मित्रांसोबत धमाल करतात ,मस्ती करतात प्रेम करतात पण ह्याला मात्र ते लाभलेच नाही लाभले ते फटके नशीब एवढीच ह्याची कथा . पण त्याकडे दुर्लक्ष्य करून तो जगात होता पण त्याच्या आयुष्यात एक दिवस कुणीतरी येत ज्याच्या येण्याने त्याचे जीवन आनंदी होऊ लागतं त्याला आता ती हवी असते पण मनात तोच विचार जर आपण लग्न केले तर तिला हि आपल्यासारखेच जगावे लागणार, आपल्यामुळे तिच्या नशिबात दुख नको .. मग तो निर्णय घेतो आता आपण ह्या प्रेमापासून दूर निघून जायचे आणि तिला काहीतरी कारण काढून दूर करतो . पण त्याला ह्या गोष्टीचे खूप दु:ख होतं खूप त्रास होतो कारण मनापासून प्रेम केले होते ना पण काय करणार नशिबात आलेल्या दुखला भोगावे तर लागणारच .. त्या मुलीचे हि खूप प्रेम असतंच पण तिला सुखात पहायचे होते म्हणूनच तर तो तिच्यापासून दूर झाला . तिच्या घरातल्यांनी तिचे लग्न करून दिले ती लग्न करून गेली हा मात्र त्या दिवशी खूप रडला कारण आता जगण्यासाठी काहीच नव्हते आणि मरण येत हि नव्हते आता फक्त वाट पाहत होता कधी मरण येतं ह्याची .. ती लग्न करून कुठे गेली कळलेच नाही वय निघत गेले हा जसा मेहनत करत होता तसाच राहिला पण कधी कधी तिची खूप आठवण यायची तेव्हा तो तिला आठवायचा तिचा तो पाकिटात ठेवलेला छोटासा फोटो आजही लपवून ठेवलेला होता तो पाहत रडायचा तिला पाणीपुरी खूप आवडायचे तो त्या गाडी जवळ जाऊन एकटाच पाहत उभे राहायचा तो तिथे येणा~या जाणा~या मुलीमध्ये तिला शोधायचा आणि थोडा हसायचा पण जेव्हा त्याला कळायचे कि ते स्वप्न आहे पुन्हा तो तिथून निघून जायचा . तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला त्याने पण तिचा पत्ता काही लागला नाही .
बघता बघता वय ५० च्या वर झाले होते तो आजही एकटाच होता त्याने तिच्याशिवाय आयुष्यात कुणालाच आणले नव्हते . तो थकला होता , कसे असतं ना आयुष्यापण कुणाला राजेशाही बक्षीस म्हणून मिळते तर काहींना रडतच जगावे लागतं आणि मरणही येत तेव्हा खांदे द्यायलाही पैसे आहेत कि नाही पहावे लागतं .
असेच तो हि एक दिवस एकटाच बसलेला होता सुट्टीचा दिवस होता रविवार होता . तो दिवस तसा रोजच्याच सारखा होता एकटाच बसलेला तिला आठवत आणि स्वतःला समजावत ती आता आपली नाही हे मनाला समजतच नव्हते .
त्यादिवशी का ठाऊक नाही तिच्या येण्याची चाहूल झाली पुन्हा तिचा हसरा चेहरा माझ्या नजरेला पडला ती आनंदी होती मला पाहून पण माझा हा अवतार पाहून तिच्या डोळ्यांत पाणी आले होते. तो उठला आणि म्हणाला " वेडे रडतेस कशाला तू आनंदी आहेस आता , बघ तुझ्या नशिबात असे माझ्यासारखे दुख नाही "....
ती म्हणाली मला ठाऊक आहे तुझे ते भांडण मुद्दाम होते मला ते उशिरा कळले रे .मला सुख मिळावं म्हणून तू माझे दुख हि तूझ्य नशिबात मागून घेतलेस , असे म्हणत तिने त्याला मिठीत घेतले ,काही क्षण श्वास थांबतो कि काय असे त्याला झाले होते कारण खूप दिवसाने तिचा स्पर्श झाला होता आणि आनंद काय असतो ते जाणवले होते पण ते आपल्या नशिबात नाही हे समजताच तिने तिला दूर केलं तिच्या मिठीतून सुटका केली .
तो म्हणाला हो मला असे दुखत तुला ढकलायचे नव्हते मी प्रेम केलें तुझ्यावर तुला सुखी पहायचे होते . बघ माझे काय मी कालही असाच गरीब आणि आजही असाच गरीब आहे .पण एक मागू तू मला देशील का ?
ती रडत होती तिला त्याला असे पाहवत नव्हते असा थकलेला शरीर कधी गळून पडेल असा तो दिसत होता .. ती म्हणाली मग ना सोन्या मी देईल तुला तू मागशील ते .. तू म्हणशील माझ्यासोबत आता हि लग्न कर तर मी आजही तयार आहे .
तो म्हणाला नाही असे नाही करायचे मला . तू फक्त मला थोडा वेळ तुझ्या मांडीवर डोके ठेऊ देशील का ?
तिने त्याला जवळ घेतले आणि डोके तिच्या मांडीवर ठेवले .
तो म्हणाला शोना मी जर आता मिलेओ तर गं ?....
तिने तिचा हाथ त्याच्या तोंडावर ठेवला आणि म्हणाली गप काही पण नको बोलूस .
तो म्हणाला खरेच शोना आता तुझ्या जवळच हे घडणार आहे ..मी खरेच तुझी वाट पाहत होतो गं ..मला हे जगणा नकोसे झालेलं मी तुला खूप शोधण्याचा प्रयत्न केलं तू कशी अशील बघण्याचा प्रयत्न केलं पण तू सापडली नाहीस .
पण आता तू आलीस ना तुला असे सुखी पाहून मी खरेच तृप्त झलेओ आता मोकळा झालो हे जीवन संपवायला ..
तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या .
आणि त्याने डोळे मिटून घेतला आणि खरेच तो बोलला ते झालं त्याने त्याचा श्वास सोडला होता , हे जग सोडले होते ....ती त्याला मिठीत घेऊन खूप रडत होती आणि देवाला म्हणत होती देवा का प्रेमाची अशी परीक्षा ? का ?.....