Sunday, September 20, 2015

एकटेपण..

कधी  कधी  खुपच  एकटं  वाटु लागतं
अन उन्हातही चक्क पाउस पडु लागतो..

बोलावं वाटतं बोलायला कुणीच नसतं
आठवणींतच हरवलेलं पुन्हा शोधु लागतं

पुन्हा विचारांची नाव बनते मन वाहत नेतं दुरवर
विचारच ते शेवटी किती झेपायचे..
आसवांच्या ओझ्यात बुडताना किनारा शोधु लागतं

एकटंच बरं वाटतं आठवणीही छळतातच
सुगंध दरवळत येतो कधीतरी
पुन्हा तिचाच आभास होऊ लागतो

किती....किती पळायचे अस्तित्वाशी
तुला शेवटी तुझंच होऊन जगावं लागतं....

©प्रशांत डी.शिंदे....
दि.२०.०९.२०१५

No comments:

Post a Comment